निसर्ग इतिहास आणि वास्तुकला

Natural History Museum
लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये जाण्याचा नुकताच योग आला. नेमकी गुड फ्रायडे आणि ईस्टरची मोठी सुट्टी आल्याने प्रचंड गर्दी होती. गर्दीचा जसा त्रास होतो, वेळ जातो तसा बऱ्याचदा फायदा देखील होतो. अशा जगप्रसिद्ध जागी देशोदेशीचे लोक एकत्र बघायला मिळतात. बहुतेक जण त्यांच्या कुटुंबियांबरोबर असतात त्यामुळे वागण्यात मोकळेपणा असतो. पाश्चिमात्य जगात कुटुंबं आपल्यासारखीच एकमेकांना बांधून असतात, मुलांच्या खोड्या चालू असतात हे पाहतांना मजा वाटते आणि जग तितकेही काही वाईट नाही असा सकारात्मक विचार जाणवतो.
या गर्दीत वाट पाहतांना माझे लक्ष मध्येच कॅमेरा चालवण्याकडे वळले आणि या देखण्या इमारतीची छायाचित्रे घेताना मला लक्षात आली ती त्याच्या रचनेतील बारकावे व ज्या कारणाने ही इमारत बांधली त्याचे प्रतीक म्हणून कोरलेली सौंदर्यपूर्ण शिल्पे. खांबांवरील मधमाशीच्या पोळ्याचे षट्कोन, पाने, वेलबुट्ट्यांबरोबरच वेगवेगळे प्राणी व पक्षी यांचा अंतर्भाव या इमारतीची रचना करणारे वास्तुतज्ञ व त्यातील बारकावे साकारणारी कारागीर मंडळी यांना दाद आपोआप मनापासून निघते. ब्रिटिश साम्राज्याच्या या राजधानीत फिरताना सारखे हे वैभव यांनी माझ्या देशाला लुटून मिळवले अशी ठसठस मनांत रहाते पण जेंव्हा असा सौंदर्यपूर्ण अविष्कार व निसर्गासारख्या जागतिक विषयाचे ज्ञानभांडार समोर असते तेंव्हा त्या ठसठशीची तीव्रता खूप कमी होते.
अधिक छायाचित्रे

रेल्वे स्थानक आणि पियानो

St_Pancras_Piano
लंडनच्या सेंट पॅन्क्राज रेल्वे स्थानकावर असे दोन तीन पियानो आहेत जे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांपैकी हौशी मंडळी वाजवत असतात. काहीजण खरोखरच सुंदर वाजवतात तर काही हात साफ करून घेतात. गजबजलेल्या वातावरणात कोणी ऐकत असेलच अशी खात्री देता येत नाही त्यामुळे बहुतेक जण स्वानंदासाठीच वाजवतात. कधी त्याची पावती देणारा कोणीतरी भेटतो तर कधी आप्तमित्र प्रोत्साहन देतात. एवढ्या मोठ्या शहरात कलेचं वातावरण ठिकठिकाणी पहायला मिळतं. मागे न्यूयॉर्क मध्येही असाच अनुभव आला होता. रेल्वेत कला दाखवून पैसे मिळवणारे भारतातही असतात पण ते भीक मागतात. इथे सगळा बाज रियाजासारखा असतो. दिलेत पैसे तर वाहवा नाही तर आमची थोडी प्रॅक्टीस झाली. देणाऱ्याचं जन्मोजन्मीचं कल्याण वगैरे बात नाही. न्युयॉर्क मध्ये तर मेट्रोमध्ये हातात एक छोटा बॉक्स स्पीकर व त्याला मोबाईल फोन जोडून काही कृष्णवर्णीय मुलांनी उभ्या आडव्या बार्सना लटकून ज्या काही कसरती दाखवल्या की डोळ्याचं पारणं फिटलं. मध्ये एक टोपी ठेवली होती बस्. स्टेशन आल्यावर आपण त्या गावचेच नसल्यासारखी ती टोळी पसार झाली. अशा कसरतीत कृष्णवर्णीयांचा जास्तच गोतावळा दिसतो. पियानोला मात्र हौशी मंडळींचाच हात लागतो आणि त्यात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस असू शकतो पण आखातातला किंवा भारतीय उपखंडातला माणूस क्वचितच किंबहुना नाहीच.

15 August–Independace Day

१५ ऑगस्ट म्हणजे काय?

आपल्या झोपडपट्टीच्या गल्लीसमोर भर रस्त्यात स्पीकरची बॅरिकेड उभी करून
त्यावर आज देशभक्तीची तर काही दिवसांनी गणपतीची तर कधी शिवाजी महाराजांची
गाणी मोठ्याने लावून आपण मित्रांबारोबर चकाट्या पीटण्याचे स्वातंत्र्य

मांडववाले, बॅनरवाले आणि ब्लडबँकवाले यांना गोळा करून दुसऱ्याच्या रक्तावर
पुण्य कमावण्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे स्वातंत्र्य

चालत्या बस मधून थुंकण्याचे, रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन रस्ता जाम करण्याचे
कितीही शिकलो तरी गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्य

थोड्याश्या डीझेलच्या बचतीसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन
निरपराध माणसांचे जीव घेण्याचे स्वातंत्र्य

पाट्या वाचून सुद्धा बसच्या लोकलच्या दारात उभे राहून अपघाती मरण्याचे स्वातंत्र्य

धोकादायक रसायन कंपनीचा परिसर, नदीच्या पुराची सीमा या सारख्या ठिकाणी
गरीबी आणि अंतर यांची सबब सांगून घर बांधण्याचे आणि
गॅसच्या धुरात किंवा  पुराच्या पाण्यात मरण्याचे स्वातंत्र्य

आपण कितीही फुटकळ नोकरी करत असलो तरी कर्ज काढून शहराच्या
मध्यवस्तीत काही हजार लोकांना बोलावून जेवू घालण्याचे स्वातंत्र्य

नवरदेवाला सजवून त्याच्या वरातीच्या निमित्ताने किंवा देवाला रस्त्यावर आणून
त्याच्या मिरवणूकीच्या, नवरात्रीच्या तोरण महोत्सवाच्या निमित्ताने
मागे शेकडो गाड्यांचे इंधन वेळ वाया घालवून
त्यांच्यापैकी कुणी थोडा जरी विरोध केला तर त्यांच्यावर
अर्वाच्य शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य

शिवाजी महाराज, बाबासाहेब यांना एकाच रंगात रंगवण्याचे आणि त्यांचा आपल्या
वर्तनात थोडाही अंश न दाखवण्याचे, त्यांच्याशिवाय आपल्या समाजात दुसरा
एकही नेता झाला नाही तरी लाज न वाटण्याचे स्वातंत्र्य

आपली कोठेही शाखा नाही हे अभिमानाने सांगण्याचे,
दुपारी एक ते चार दुकान बंद ठेवणाऱ्या मराठी माणसाला हसण्याचे
आणि तसेच वागणाऱ्या युरोपिअन लोकांचे गोडवे गाण्याचे स्वातंत्र्य

अल्पसंख्यांकांची बाजू ऐकताना बहुसंख्यांची वाट लावण्याचे, माणुसकीच्या नावाखाली
बेकायदा मतदारांवर कायद्याने चालणाऱ्या लोकांचे पैसे उधळण्याचे स्वातंत्र्य

बऱ्याचश्या पैशांसाठी आपल्याच देशाच्या लोकांची मारण्याचे,
देशाच्या गौरवाकारिता भ्रष्टाचार करणारयाला अभय देण्याचे पण
त्याच देशाला पदक मिळण्याकरिता काहीही न करण्याचे  स्वातंत्र्य

माझ्या देशाची संस्कृती महान म्हणुन तिच्या महानतेच्या पुराव्यावर थुंकण्याचे,
जगात सगळीकडे लबाड्या करण्याचे स्वातंत्र्य

आपल्याच देशाच्या पोलीसदलात एक महिला असून व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे
पण त्याच देशात चोरांनाही राजे म्हणुन संरक्षण द्यावे लागण्याचे स्वातंत्र्य

याच देशात कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करिता कुठेतरी जंगलात
आनंदवन निर्माण करण्याचे स्वातंत्र्य, दुसऱ्यांची जमीन सुपीक व्हावी म्हणुन
धरणात ज्यांची जमीन गेली त्यांच्या जागेकरिता लढण्याचे,
मोडक्या तोडक्या बंदुकांनी आणि फुसक्या जाकेटमधून
लढून अतिरेक्यांना पकडण्याचे स्वातंत्र्य

देशाच्या सरहद्दीवर शिपायांच्या पराक्रमावर अधिकाऱ्यांनी पदके मिळवण्याचे स्वातंत्र्य आणि असे अधिकारी मिळाले तरी आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्याचे स्वातंत्र्य

जय हिंद

Marathi Songs and FM Radio

कौशल इनामदार हा मराठी तरुण पिढीचा आघाडीचा संगीतकार. त्यांनी सुरेश भटांच्या गीताला एक अप्रतीम चाल लावली आणि मराठी भाषेच्या अभिमान गीताचा जन्म झाला. तो यावर नुसता थांबला नाही तर मराठी माणसांनी विचार केला नसेल असा पराक्रम त्याने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी करून तो अमलात देखील आणला. अनेक गुणी पण अव्यावसायिक गायकांना एकत्र आणून आणि भारतातील उत्तम तंत्रज्ञांना (फक्त मराठी हवेत असा अवास्तव आग्रह न धरता फक्त उत्तम देण्याच्या ध्येयाने) एकत्र आणून या गाण्याला जन्माला घातले. एक माता जितक्या वेदना सहन करेल तितक्याच तळमळीने त्यांनी हे गीत मराठी लोकांसमोर सादर केले.

मराठी अभिमान गीत यु ट्यूब वर…

आता प्रश्न आला लोकांसमोर मराठी गाणी पोचवायचा. मुंबईमध्ये जवळजवळ सर्व रेडिओ वाहिन्यांनी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी धंद्याचा काळजी पोटी मराठी गाणी लावत नाही असे कौशलला सांगितले. त्याने हा प्रश्न अनेक पद्धतीने लोकांसमोर मांडला पण अखेर शिवसेना प्रमुखांच्या तलवारीची भाषा कामी आली. यावर खूप उहापोह इंटरनेट वर झालं आणि होत राहील. आपण जर का सारेगमप किंवा इतर मराठी गाण्यांचे कार्यक्रम पहात असाल तर लक्षात येईल की मराठी गाण्याच्या विश्वात मध्ये एक अंधारा काळ आहे. या काळात फारसे दर्जेदार संगीत बनलेच नाही. आपण मराठी माणसे देखील लता, आशा, बाबुजी, खळेकाका, हृदयनाथ इत्यादींच्या पलीकडे गेलोच नाही. पुढच्या पिढीत अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चांगले संगीतकार झाले आणि त्यांना देखील दर्जेदार चित्रपट न आल्याने संधी मिळाल्या नाहीत. अनिल-अरुण, श्रीधर फडके, सुधीर मोघे, अशोक पत्की  अशा काही संगीतकारानंतर आताच्या पिढीतल्या सलील, अवधूत, अजय – अतुल यांच्या मध्ये फारश्या चांगल्या रचना झाल्याच नाहीत.

या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंद. मराठी गाण्यात हा एक फार मोठा दुर्लक्षित भाग राहिला. काही मोजकी आणि तीच तीच वाद्ये, एखाद्या कारखान्यातून सतत तोच तोच जून माल बाहेर पडावा तशी गाणी आणि त्यावर अत्यंत गरीब आणि अशक्य डिझाईन चे कपडे घातलेले नायक नायिका (कल्पना करा लक्ष्या आणि अलका कुठल्या तरी बागेत) हे सगळे मराठीला फार मागे आणि “down market” ठरविण्यास कारणीभूत झाले. त्यातच भर म्हणजे मराठी गाणी. क्लिष्ट शब्द, त्याच त्याच उपमा आणि अलंकार आणि तेच तेच विषय. नायिकेला न साजेसे तिचे वर्णन किंवा त्याच त्याच लावण्या. मराठी लोकांना हिंदीचा एक सोपा पर्याय आहे त्यामुळे लोकांची भूक त्याने भागली आणि मराठी संगीत सृष्टी उपासमारीला लागली. बंगाली लोकांनी या काळात मात्र हिंदीला गायक आणि संगीतकारांचा पुरवठा केला तसेच दोन्ही भाषात या लोकांनी गाणी केल्याने त्यांना आपले वैभव टिकवणे सोपे गेले. मराठी मंडळीनी या काळात फक्त एक मोठी गायिका हिंदीला दिली अनुराधा पौडवाल. मराठी संगीतकारांना हिंदीची स्वप्ने पडलीच नसावीत किंवा त्यांचा तेवढा आवाका असल्याची कुणाला खात्री वाटली नसावी.

आज अनेक वर्षांनतर जशी मराठी सिनेमाने कात टाकली तशी मराठी संगीत देखील कात टाकत आहे. यात मुख्य वाटा नव्या पिढीच्या सहज सोप्या भाषेत लिहिलेल्या कविता/ गाणी (उदा. संदीप खरे, गुरु ठाकूर) आणि नव्या पिढीला आवडणाऱ्या वाद्य संगीताचे रचनाकार (उदा. अजय-अतुल, अवधूत) यांचा आहे. काहीतरी नवे ऐकायला मिळत आहे आणि प्रयोग होत आहेत. जेंव्हा नव्याची भूक भागते तेंव्हा मग तरुण वर्ग अभिजात संगीताकडे वळतो.  मराठी कान गेली कित्येक वर्षे जुन्यामाध्येच रमला होता. तो आता कुठे नवीन रचना ऐकू लागलाय. त्याला असेच सतत काही मिळाले म्हणजे नवीन लोकांना उत्साह येईल आणि या सगळ्यातून जी मरगळ निघून जात आहे टी अजून वेगाने पळून जाईल. अजय – अतुल आणि इतरही सर्व मराठी संगीतकारांनी, गायकांनी मराठी बरोबरच हिंदी सगीत क्षेत्रात भरारी मारायची स्वप्ने बघितली पाहिजेत आणि तिथे नाव मिळाल्यावरही मराठीत काम केले पाहिजे. संगीताला भाषा नसते पण गाण्याला ती लागते. जो मान सन्मान इतर भाषा मिळवतात तो काही लढाई करून नाही फक्त स्वाभिमान बाळगून. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगायलाच हवा.

आज आनंदी आनंद झाला – Google Transliteration

मी आज खूप खुश आहे आणि याला कारण म्हणजे गुगलनी नवा टायपिंग चा फंडा विंडोज वर उपलब्ध करून दिला आहे. Transliteration च्या माध्यमातून आणि त्याला शब्दासंग्रहाची जोड देऊन आपण लिहीत असलेल्या नेहमीच्या रोमन लिपीतल्या मराठी शब्दाना आता देवनागरी लिपीची जोड मिळाली आहे. आता मला मराठी भाषेत लिहिणे खुपच सोपे झाले आहे मला खरेतर इन् स्क्रिप्ट कीबोर्ड येत होता आणि त्यावर माझा स्पीड पण चांगला आहे. पण रोज इंग्रजी मध्ये टाईप केल्याने त्यात फार काही वाढ होत नव्हती. माझी आहे तीच सवय कायम ठेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन गुगल ने मराठी आणि इतर आणखी काही भारतीय भाषा भगिनींना जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवणे आणखी सोपे केले आहे.

मायक्रोसॉफ्ट असाच काही प्रयत्न अरेबिक भाषेकरिता करत आहे. आणि मला खात्री आहे की या शर्यतीत ते मागे राहणार नाहीत. स्पर्धा कायमच तुम्हाला काहीतरी नवीन आणि चांगले करण्यास भाग पाडते. आणि त्याचा फायदा जर जगाला होत असेल तर त्या बद्दल या अमेरिकी कंपन्याना धन्यवादच दिले पाहिजेत. आज या कंपन्यात हजारो भारतीय काम करत आहेत आणि त्यामुळेच आपली आणि आपल्या भाषांची दखल घेतली जात आहे. या साऱ्याचा फायदा आपल्या देशातील असंख्य लोकांना, ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही किंवा जुजबी येते, अशांना संगणक साक्षर होण्याकरता नक्कीच होईल आणि या कारणाने भारताची प्रगती आणखी कैक पटीनी वेगात होईल असे मला ठामपणे वाटते.

आपणालाही जर माझ्याप्रमाणे मराठीत टाईप करायचे असेल तर गुगल च्या या पानावर जा. आणि हे सोफ्टवेअर डाउनलोड करण्याकरता या पानावर जा.

Zee Marathi Saregamapa is degrading itself

I am not sure if it is just my sentiments and personal views or is it really a general public opinion and I will be depending on readers’ comments to understand the ground level situation. This week, Apoorva Gajjala was eliminated from the current season of Zee Marathi Saregamapa and it hurt. I should so much be used to this now that in this country quality is not appreciated above the clan, cast dynamics. However, I am not getting that thick skinned. During the Little Champs season, when I was not happy about Kartiki getting mileage over Arya & Prathamesh I got lot of bashing and some of it was full of hatred. I did not take it much to heart and thought this was going to happen.

Continue reading “Zee Marathi Saregamapa is degrading itself”

Zee Marathi Saregamapa – Apoorva Gajjala goes Shalmali Sukhtankar way

Zee Marathi Saregamapa team has done it again and again and again. So I was not surprised when out of Rutuja Lad, Swarada Gokhale and Apoorva Gajjala, Swarada did not go out.

Swarada was not at all a finalist still she came to the top 10 without anyone blinking an eye at ZM-SRGMP. Apoorva had to fight. Ashwini Deshpande went before Swarada and now Apoorva has also been thrown out. She will get a chance in the next week alright. But look at the morale of the participant.

Continue reading “Zee Marathi Saregamapa – Apoorva Gajjala goes Shalmali Sukhtankar way”

Zee Saregamapa – Finally Rutuja Lad is appreciated

This week we finally saw Rutuja’s talent being appreciated. I was wondering how she did not directly reach the finals despite getting good marks. Looks like that has a good effect on her and she has bounced back. When all the hyped toppers showed complacency and some made really unforced errors as they say in tennis, Rutuja maintained her progress and sang really well. Not sure if she will win the finals as the competition is tough. But I certainly think she will and should be one of the top 3-4.

Rutuja Lad – Ghei Chhand Makarand

MLA slapped in Maharashtra Assembly

थोडी गंमत-

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की चि. अ. आ. (A. A.) जो आपले श्री. रोख ठोक (R.T)  यांचे तालावर डोलत नव्हता तो आता आजचे तरुण संगीतकार व श्री. ऱोख ठोक यांचे शिष्य श्री. राम कदम यांनी वाजविलेल्या ढोलकीवरील थापेला प्रतिसाद देऊन अ आ इ ई शिकण्यास सुरुवात करणार आहे. (या ढोलकीला गेंड्याची कातडी होती असे अनधिककृत सूत्रांकडून कळले आहे).

परंतु प्रसिद्ध नृत्यांगना टकाटक ताथैया यांनी मात्र कदम यांच्या तालावर नाचण्यास नकार दिला आहे.

A lot of people who everyday want to slap someone who is breaking rules and showing arrogance are happy that finally there is one music director who has courage to slap this political drum.

As long as such drums are beaten up to raise the voice of common sense, people will appreciate the music of Mr. Rokh Thok. If the music director becomes a drum, people will loose hope in listening to good music. Continue reading “MLA slapped in Maharashtra Assembly”

Puneri Pundit Voted

Puneri Pundit voted in the Maharashtra Assembly elections 2009 but unfortunately 50% of Puneris did not cast their votes leaving me wondering as to the reasons behind this. One thing I feel is that when the government declares holiday and that to on a day like Tuesday, lot of people from metros jump on this opportunity and take leaves on Monday to enjoy a long weekend and desired break from work. So the measure from EC to ensure high voting percentage did not work. On the other hand it does bring in a doubt in my mind that was it an intentional move from government? The MNS support figures from urban areas were worrying the ruling party as well as opposition and most of these voters were new and young voters who would typically go on long weekends on any such opportunity.

Whatever may be the reason, 50% of the urban voters said they are not interested in voting. Now if we look at the share of votes by all winning parties, they typically get about 30-35 % of the total votes which means about 15-18% of total voters. Does it really make sense to declare these folks are winners in the election? How should we reduce that fractured voting and ensure that the ruling party really represents majority of us? One idea comes to my mind is that the losing candidates should declare support to top candidates from any constituency until the winner gets 50% of the casted votes at least. This will then show the inclination of the small time players in the field and also let people know as to who was supporting them really from behind.

Another way I feel is that the elections should be conducted on Sundays. The reason I believe they conduct them on weekdays is to allow candidates connect with voters on the weekend. But by conducting the voting on Sunday we can really get a better turn out and hence better representation.

I am happy that since I have voted, I can talk about the government, politics and other issues where I feel we deserve better.